logo

पाच दिवस नदीपात्रातील चिखलात अडकलेल्या आदित्यला मिळालं जीवदान, काळ आला होता पण वेळ आली नव्हती!

कोल्हापूर : दिवसा उजेडी पहावे तिकडे प्रदूषित, दुर्गंधीयुक्त काळे पाणी आणि दिवस मावळल्यापासून रात्री गर्द अंधार, अशातच मगरी, मोठे मासे अशा जलचरांचा धोका! अशाही संकटाला तो तोंड देत तब्बल पाच दिवस नदीपात्रात होता. शुक्रवारी त्याच्या मदतीच्या ओरडण्याची हाक त्याला वाचवायला गेलेल्या बचाव पथकाला ऐकू आली आणि त्यांच्या मदतीमुळे संदीप प्रथमच जमिनीवर आला. ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’, असा जीवघेणा प्रसंग होता. शिरढोणच्या बेपत्ता आदित्य मोहन बंडगर याच्या जगण्या मरण्याची काळ जणू परीक्षाच घेत होता.

त्याचे झाले असे की शिरोळ तालुक्यातील शिरढोण येथील आदित्य बंडगर हा युवक गावातील पंचगंगा नदी पात्रात पोहायला गेला होता. नदीत त्याने सुर मारला. पण पुढे काय झाले त्याला समजलेच नाही. तो नदीपात्रात पुढे जाऊन चिखलाच्या एका भागात अडकून पडला. ते तब्बल पाच दिवस. दरम्यान, त्याचा शोध सुरू राहिला. गेल्या पाच दिवसांपासून बोटीच्या सहाय्याने रोजच त्याचा शोध घेतला जात होता. ड्रोनचा वापर करूनही तो कोठे दिसतो का याचा आदमास घेतला जात होता. काहीच अंदाज येत नव्हता. नदीतील मगरी, मोठे मासे यांमुळे इकडे नागरिकांनी तर्कवितर्क सुरू केले होते.

9
2158 views